मंगळवार, २६ एप्रिल, २०११

डायरीच पान: २६ एप्रील २०११

काही दिवसांपुर्वी मला एका रिक्रुटिंग एजन्सीतुन फोन आला. ती पोरगी मला जाम पकवत होती.पण त्या पोरीला माझ्या सगळ्या डिटेल्स माहीत होत्या. मी तीला झापणारच होते एवढ्यात मेरे दिमाग की बत्ती जल गई.हिला कस बर कळल माझ्याबद्दल?ही व्यक्ती कोणी तरी ओळखीचीच असावी.पण तिने मला दाद लागु दिली नाही. अखेर थोड्या वेळाने म्हणाली "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!"

मी दोन मिनिट स्तब्धच. अत्यानंदाने माझ्या लोंडुन शब्दच फुटेनात.माझ्या अनमोल रत्नहारातील एक हरवलेलं रत्न गवसल्याचा आनंद झाला होता मला. "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!" हे तिचे शब्द सरळ १०-१२ वर्ष मागे घेउन गेले मला . " हॅलो, स्मिते अग ऐकतियेस ना?" " हं हं . *** ना ग तु? कशीयेस?......." मग बराच वेळ बोलुन आम्ही फोन ठेवला. खर आठवणीच्या जगातुन बाहेर यायच नव्हत मला. तिथेच रममाण झाले होते मी.माझ बालपण, माझे सवंगडी, मैत्रिणी, आमचा दंगा, मस्ती सगळ सगळ माझ्यासारखच तिनेही आठवणीत जपुन ठेवल होत. वडलांच्या बदलीमुळे दुरावलेली प्रीती मला पुन्हा गवसली होती.

मी व प्रीती अगदी "चड्डी-बड्डी"[सौजन्यः प्रीती]. सहावी पर्यंत एकत्र शिकलो. बाईंना वैताग आणला ;)
मी माझ्या आडनावाच्या विरुद्ध आहे अशी माझी प्रसिद्धी असली तरी प्रीतीसुद्धा काही कमी नव्हती. बडबड करण्यात मला सदैव टफ फाईट असायची तिची. हेहे. आम्ही दोघी वर्गात असलो की बाईंचा घसा ओरडुन दुखायचा पण आमची बडबड संपायची नाही.चुकुन माकुन एखाद दिवशी आम्ही दोघीही गैरहजर असलो तर बाई सुटकेचा नि:श्वास टाकत. आम्हा दोघींपैकी कुणालाही शोधायचे असल्यास, ज्या वर्गातुन अखंड बड्बड ऐकु येतेय ना, त्या वर्गात जा सापडतील, अश्या डायरेक्शन्स दिल्या जात !! पण एवढ्या बडबडीत अभ्याससुद्धा पुर्ण असत असे. आणि आमच्या बडबडीकडे लक्श देत असणार्‍या इतर लोकांना शिक्षा !!! .हीही आपली केमिस्ट्री कित्ती मस्त होती नै? तोंडुन बोलल नाही तरी तू इशारे समजत असस.
प्रीती सहावीनंतर तु शाळा सोडलीस.मला अन्य मित्र मैत्रिणी लाभले. पण तुझ्याएवढी जवळची कुणीच नाही ग. खूप मिस केल तुला. बर फोनचा सुकाळ नसल्याने ते माध्यमही नव्हत संपर्काच. आणि ढमे पत्ता तु दिलास नव्हता :x.

मधेच ९वीत असताना तु शाळेत आली होतीस आठवतय? मला बोलणच सुधरत नव्हत.डोळ्यातल पाणी बाहेर ओघळु न देता बोलण कठिण जात होत ग मला. तु आलीस नेहमीसारखी सर्वांना भेटलीस, बोललीस, आणि गेलीस सुद्धा परत!!!. मी मात्र शुंभासारखी बघतच राहिले. तुझा संपर्काचा पत्ताही घेतला नाही.:( पण घरी जाउन स्वतःला खूप कोसल होत मी. तिच्याशी बोललीस सुद्धा नाही . काय विचार करेल ती तुझ्याबद्दल? . पण मग जी तु गायबलीस ना, ती अश्शी गायबलीस की मला पत्ताच लागला नाही तुझा. खूप प्रयत्न केला तुला शोधायचा. पण नाही सापडलीस. मग तर मी आशाच सोडुन दिली. आणि मग शिक्षणावर लक्ष केंद्रित केल. मला वाटल तु कदाचित विसरुनही जाशील मला.

पण माझीच 'सुभद्रा' तू. शोधलसच मला. कित्ती खूश झाले मी हे शब्दात वर्णन करण अशक्य आहे. त्या दिवशीच्या कॉलनंतर तुला प्रत्यक्ष भेटायची जब्बरदस्त इच्छा होती. तु आजही माझी तीच सुभद्रा आहेस. तसुभरही फरक पडलेला नाहीये तुझ्यात. तश्शीच हसरी, मायाळु, बिनधास्त, अवखळ आणि तितकीच जबाबदार प्रीती!!

तु मला शोधल्याने मला अजुन एक रत्न परत मिळालय. Thanks ग!!!

३ टिप्पण्या: