मंगळवार, २६ एप्रिल, २०११

डायरीच पान: २६ एप्रील २०११

काही दिवसांपुर्वी मला एका रिक्रुटिंग एजन्सीतुन फोन आला. ती पोरगी मला जाम पकवत होती.पण त्या पोरीला माझ्या सगळ्या डिटेल्स माहीत होत्या. मी तीला झापणारच होते एवढ्यात मेरे दिमाग की बत्ती जल गई.हिला कस बर कळल माझ्याबद्दल?ही व्यक्ती कोणी तरी ओळखीचीच असावी.पण तिने मला दाद लागु दिली नाही. अखेर थोड्या वेळाने म्हणाली "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!"

मी दोन मिनिट स्तब्धच. अत्यानंदाने माझ्या लोंडुन शब्दच फुटेनात.माझ्या अनमोल रत्नहारातील एक हरवलेलं रत्न गवसल्याचा आनंद झाला होता मला. "अग ओळखलीस का मला? मी प्रीती!!!" हे तिचे शब्द सरळ १०-१२ वर्ष मागे घेउन गेले मला . " हॅलो, स्मिते अग ऐकतियेस ना?" " हं हं . *** ना ग तु? कशीयेस?......." मग बराच वेळ बोलुन आम्ही फोन ठेवला. खर आठवणीच्या जगातुन बाहेर यायच नव्हत मला. तिथेच रममाण झाले होते मी.माझ बालपण, माझे सवंगडी, मैत्रिणी, आमचा दंगा, मस्ती सगळ सगळ माझ्यासारखच तिनेही आठवणीत जपुन ठेवल होत. वडलांच्या बदलीमुळे दुरावलेली प्रीती मला पुन्हा गवसली होती.

मी व प्रीती अगदी "चड्डी-बड्डी"[सौजन्यः प्रीती]. सहावी पर्यंत एकत्र शिकलो. बाईंना वैताग आणला ;)
मी माझ्या आडनावाच्या विरुद्ध आहे अशी माझी प्रसिद्धी असली तरी प्रीतीसुद्धा काही कमी नव्हती. बडबड करण्यात मला सदैव टफ फाईट असायची तिची. हेहे. आम्ही दोघी वर्गात असलो की बाईंचा घसा ओरडुन दुखायचा पण आमची बडबड संपायची नाही.चुकुन माकुन एखाद दिवशी आम्ही दोघीही गैरहजर असलो तर बाई सुटकेचा नि:श्वास टाकत. आम्हा दोघींपैकी कुणालाही शोधायचे असल्यास, ज्या वर्गातुन अखंड बड्बड ऐकु येतेय ना, त्या वर्गात जा सापडतील, अश्या डायरेक्शन्स दिल्या जात !! पण एवढ्या बडबडीत अभ्याससुद्धा पुर्ण असत असे. आणि आमच्या बडबडीकडे लक्श देत असणार्‍या इतर लोकांना शिक्षा !!! .हीही आपली केमिस्ट्री कित्ती मस्त होती नै? तोंडुन बोलल नाही तरी तू इशारे समजत असस.
प्रीती सहावीनंतर तु शाळा सोडलीस.मला अन्य मित्र मैत्रिणी लाभले. पण तुझ्याएवढी जवळची कुणीच नाही ग. खूप मिस केल तुला. बर फोनचा सुकाळ नसल्याने ते माध्यमही नव्हत संपर्काच. आणि ढमे पत्ता तु दिलास नव्हता :x.

मधेच ९वीत असताना तु शाळेत आली होतीस आठवतय? मला बोलणच सुधरत नव्हत.डोळ्यातल पाणी बाहेर ओघळु न देता बोलण कठिण जात होत ग मला. तु आलीस नेहमीसारखी सर्वांना भेटलीस, बोललीस, आणि गेलीस सुद्धा परत!!!. मी मात्र शुंभासारखी बघतच राहिले. तुझा संपर्काचा पत्ताही घेतला नाही.:( पण घरी जाउन स्वतःला खूप कोसल होत मी. तिच्याशी बोललीस सुद्धा नाही . काय विचार करेल ती तुझ्याबद्दल? . पण मग जी तु गायबलीस ना, ती अश्शी गायबलीस की मला पत्ताच लागला नाही तुझा. खूप प्रयत्न केला तुला शोधायचा. पण नाही सापडलीस. मग तर मी आशाच सोडुन दिली. आणि मग शिक्षणावर लक्ष केंद्रित केल. मला वाटल तु कदाचित विसरुनही जाशील मला.

पण माझीच 'सुभद्रा' तू. शोधलसच मला. कित्ती खूश झाले मी हे शब्दात वर्णन करण अशक्य आहे. त्या दिवशीच्या कॉलनंतर तुला प्रत्यक्ष भेटायची जब्बरदस्त इच्छा होती. तु आजही माझी तीच सुभद्रा आहेस. तसुभरही फरक पडलेला नाहीये तुझ्यात. तश्शीच हसरी, मायाळु, बिनधास्त, अवखळ आणि तितकीच जबाबदार प्रीती!!

तु मला शोधल्याने मला अजुन एक रत्न परत मिळालय. Thanks ग!!!

आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)




पोर्तुगिजांचा गोव्यात शिरकाव
व्हाश्कु द गामा (आंतरजालावरून साभार)

युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८). व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला. कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहून तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबारच्या हिंदुंना घेउन गेला, (आता तिकडे नेलं म्हणजे त्यांना ख्रिस्ती बनवणं हे तर ओघाने आलंच) आणि मग परत पाठवुन दिले. (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती.) तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजं / गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.
व्हाश्कु द गामाचे जहाज (आंतरजालावरून साभार)


इ. स. १५०३ च्या ६ एप्रिलला पोर्तुगालच्या राजाने, अल्फान्सो दे आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फे तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ्रांसिस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्याला तशी योग्य भूमी मिळत नव्हती.

ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हणजे हिंदु स्त्रिया व मुसलमान पुरुष यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर. भटकळ, होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागात त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्तानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दशः पाळला. जवळ जवळ दहा हजाराहून अधिक नायट्यांना ठार मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर साम्राज्याला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी वेर्णेच्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले. पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत. तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय पण विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होईल व आपण सुभेदार बनू अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती कारण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले.

पण झाले भलतेच.

--------------

गोवा जिंकल्यानंतर

अफोंसो द आल्बुकर्क (आंतरजालावरून साभार)

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे, जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटवाबाटवी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष छळ वगैरे सगळं राजरोस सुरू झालं. १ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झालं नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिनचा होता. दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे दोन प्रयत्न इ. स. १५१६ व इ. स. १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे तीन महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजांना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इ. स. १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता.

याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.


- टीम गोवा

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

माका वाटता माज्या लग्नाचो विचार

आता ह्यां गाणा बगा .. सोप्प्यां आसा . बगा जमतलाच तुमका हेची माका ग्यारेंटी आसा.


चेडु: माका वाटता माज्या लग्नाचो विचार मनात येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो: काय म्हटलय? परतुन एकदा सांगशीत काय

चेडु: माका वाटता माज्या लग्नाचो विचार मनात येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो :पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला
काय,हय मा?

चेडु
: नाय नाय
( तु चारांच्या ठोक्यार घराकडे ये
माजो हात मागान घे, लजा नको ) -२

चेडो: सात फेरे माज्या बरोबर , सपना बगतस ..
कडकडीत उन्तात तारे बघतस
नाय गो बाये .. माका चाय प्येवची नाय

चेडुं : कित्याक? -२

चेडो: अगे माजे बाये माका माफ करुन टाक

चेडुं: अश्याच तुज्या वागण्यामुळे हाय माझा मन तुज्यावर येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो: नाय ना नाय ना
पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला

चेडु
: ( मस्करी करु नको, सताव नको माका सजणा
गप्चिप हय म्हण ,तुका शपथ माझी , घरा चलना)-२

चेडो: प्राणप्रिये मान्य आसा मी तुज्यावर जीव ओवाळतंय
प्रेम बिम बरा आसा, लग्नाच्या नावान चळचळा कापतंय
लग्नाआधी सगळांच बरा वाटता
मगे सगळो जलम रडुचा लागता

चेडुं: अश्याच तुज्या वागण्यामुळे हाय माझा मन तुज्यावर येयला
म्हणानच आईन माज्या तुका चायेक बोलयला

चेडो :पक्षी एकटो बघुन माका ह्या जाळां पसरवलां
म्हणानच आईन तुज्या माका चायेक बोलयला

चेडु: तुका माझी शप्पत , येतलस मां?

चेडो
: नाय अज्जीबात येवचंय ना
हय गो , तुजी शप्पत येतलंय


बगलात कळ्ळां मा कोन्ता गाना तां?

ह्या बगा
लताबाई आनी किशोर कुमार ह्येन्नी गायलेला सौतने सिनेमातला शायद मेरी शादीका खयाल ह्या गाणां

लडकी:शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका:क्या कहा? फिरसे दोहराओ ना

लडकी:शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका: पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है
क्यों, है ना?
लडकी: नहीं- नहीं
( तुम ठीक चार बजे घर चले आना
मेरा हाथ मांग लेना, जरा न शरमाना)-२

लडका: सात फेरे संग मेरे सपने देख रही हो
खिली हुइ धूप में तारे देख रही हो
अरे नहीं बाबा चाय नही पिना

लडकी: इन्हीं अदाओं पर तो हाय अपना दिल आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका: ना ना ना ना
पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है

लडकी:(दिल्लगी ना करो छेडो मत हमको सनम
हां करदो घर चलो तुमको मेरी कसम )-२
लडका: जान-ए-मन माना हम तुमपे मरते हैं
प्यार तो ठीक है शादी से डरते हैं
शादी से पहले सब अच्छा लगता है
सारी उम्रभर फिर रोना पडता है

लडकी: इन्हीं अदाओं पर तो हाय अपना दिल आया है
इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

लडका:पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है
इसिलिये मम्मीने तेरी मुझे चाय पे बुलाया है

लडकी: तुम्हें मेरी कसम आओगे ना?

लडका: नहीं बिलकुल नहीं
हां तेरी कसम आऊंगा

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता ....

उंहुंहुं उहुं हुं उंहुंहुं उहुं हुं
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता
उंहुंहुं , ए हेहे , आहाहा ओहोहो


थोड्याच वेळान हें कितें जालें
नजरो मेळतकच , खंय शेणलें

थोड्याच वेळान हें कितें जालें
नजरो मेळतकच , खंय शेणलें

गर्दीन आसातें थंय ते लोकांच्या
आनी कितलो एकुलयो हांव फेस्तान मोगाच्या

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता


उंहुंहुं , ए हेहे , आहाहा ओहोहो

कॉमेस जाली काणी म्हजी
माज्या काळजान आयकूना गजाल माजी

कॉमेस जाली काणी म्हजी
माज्या काळजान आयकूना गजाल माजी

शीम पार करुन गेलें
आपुणुय बेजार जालें आनी म्हाकाय करुन गेलें

काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
काळीज कित्याक हे माजे बोबाट मारता
इंगा ना , तिंगा ना, तुजाचकोडेन चलता


वळकलें खंचे गाणे गुणगुणतां हांव ? वळखले जाल्यार सागांत पळोवया :)

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

आमचे गोंय - भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता



इ. स. ९६० मध्ये हळसी चा कदंब राजा कंटकाचार्य याने शिलाहार राजा भीम याच्याकडून गोवा जिंकून घेतला. पण शिलाहारांनी त्याच्याकडून गोवा परत जिंकून घेतला. कंटकाचार्य ऊर्फ षष्ट्यदेव याची पत्नी कुंडलादेवी ही कल्याणी चालुक्यांची कन्या. आणखी साधारण २० वर्षानी षष्ट्यदेवाने अपल्या सासर्‍याचीच मदत घेऊन शिलाहारांना पराभूत केले. आणि याच सुमारास राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणी चालुक्य कुळातील राजा जयसिंह दुसरा याची सत्ता सप्तकोकणात प्रस्थापित झाली. चालुक्यांचा मांडलिक म्हणून षष्ट्यदेव चंद्रपूर येथून दक्षिण कोकण आणि गोव्याचा कारभार पाहू लागला. भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो, तसाच कदंब राजवटीचा सुमारे ४०० वर्षांचा हा काळ गोव्याच्या इतिहासात दुसरे सुवर्णयुग म्हणून नोंदला गेला.

कदंबांना 'कदंब' हे नाव कसं मिळालं यामागे एक कथा आहे. यांचा एक पूर्वज 'मुकण्णा' हा इ. स. च्या चौथ्या शतकात, सौंदत्ती इथे कदंब वृक्षाच्या तळी बसून तपश्चर्या करत होता, तेव्हा त्याला त्रिलोचन हरिहराचा दृष्टान्त झाला. इथून या घराण्याचे नाव कदंब असे पडले. म्हणूनच कदाचित, कदंब राजे शिवभक्त होते. कदंब राजवंशाची स्थापना 'मयूरवर्मा' या दक्षिण पल्लवांच्या अमात्याने केली असं मानलं जातं. काही काळाने त्याने पल्लवांची नोकरी सोडून हल्याळ, शिर्सी, कुमठा, कद्रा या प्रदेशात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. काही इतिहासकारांच्या मते त्याचं मूळ नाव मयूरशर्मा असं होतं आणि राज्य स्थापन करताना क्षत्रियोचित असं मयूरवर्मा हे नाव त्याने घेतलं. काही इतिहासकारांच्या मते हे घराणं नागवंशातलं होतं, तर काही त्यांना मौर्यांचे संबंधित मानतात. काही इतिहासकार त्याना यदुवंशातलेही मानतात!

कदंब राजांची सत्ता मुळात कर्नाटकातील कुंतल प्रदेशातली. तिथे त्यांचं राजचिन्ह "हनुमान" हे होतं. गोव्यात येताच त्यानी आपलं राजचिन्ह बदलून "सिंह" हे केलं. याचं कारण म्हणजे गोव्यातील कुशवनात (आताचा केंपे तालुका) तेव्हा सिंह भरपूर प्रमाणात होते. तसंच कदंब राजे स्वतःला सिंहाप्रमाणे शूर समजत असत. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर मगो पक्षाने याच सिंहाला आपल्या पक्षाची निशाणी म्हणून स्वीकारलं, तर बसवाहतूक करणार्‍या सरकारी 'कदंब परिवहन मंडळाने' कदंबांच्या नावाबरोबर त्यांचं बोधचिन्ह 'सिंह' याचाही स्वीकार केला.

शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे होणारा व्यापार अरबांच्या हातात होता. तिसवाडी बेटवर त्यांची 'हंजमाननगर' नावाची मोठी व्यापारी वसाहत होती. त्यांना शिलाहारांनी बर्‍याच बाबतीत स्वायत्तता दिली होती. षष्ट्यदेवाचा मुलगा, कदंब राजा गुहलदेव याने या अरब व्यापार्‍यांबरोबर आपल्याला फायदेशीर होईल अशा प्रकारचा करार केला. गुहलदेवाचा मुलगा षष्ट्यदेव (दुसरा) याच्या काळात गोव्यात कदंबांची सत्ता स्थिर झाली. त्याने गोव्यावर इ.स. १००५ ते इ.स. १०५० एवढा काळ राज्य केलं. त्याच्यानंतर गोव्यात त्याचे २ मुलगे जयकेशी (पहिला) आणि वीरवर्मादेव यानी राज्य केलं. पहिल्या जयकेशीच्या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे इ.स. १०५४ साली गोव्याची राजधानी 'चंद्रपूर' इथून हलवून 'गोवापुरी' (गोपकपट्टण) म्हणजे आताचं गोवा वेल्हा (थोरले गोवे) इथे गेली. याचं कारण म्हणजे कुशावती नदीचं पात्र गाळाने भरून अरुंद झालं होतं आणि तिथून गलबताना ये-जा करायला त्रास होत होता. तसंच पहिल्या जयकेशीने इ.स. १०६०-६५ च्या दरम्यान उत्तर कोकणावर स्वारी करून आपल्या राज्याचा विस्तार केला.

जयकेशीचा मुलगा गुहलदेव (दुसरा) याने राजधानी परत चंद्रपूर इथे नेली ती इ.स. १०८१ मध्ये. इ.स. १०८१ ते इ.स. ११२६ पर्यंत परत चंद्रपूर हीच गोव्याची राजधानी होती. पण गोपकपट्टण इथे कदंबांचे सामंत कारभार पाहत असत. मध्येच इ.स. १०९५ साली कोकण शिलाहार राजा अनंतपाल याने गोव्यावर हल्ला करून गुहलदेवाचा पराभव केला. गुहलदेव पळून हाळसी (खानापूर) इथे गेला, तो इ.स. ११०६ मध्ये परतला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा जयकेशी (दुसरा) राज्यावर आला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार पूर्ण कोकण, गोवा, धारवाड, बेळगाव, हुबळी आणि हनगल प्रांत एवढा वाढवला. इ.स. ११३८ मध्ये विक्रमादित्य चालुक्याच्या मृत्युनंतर दुसर्‍या जयकेशीने चालुक्यांचं मांडलिकत्व झुगारून दिलं. यामुळे रागावून चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर याने 'अच्चुगी' नावाच्या सेनापतीला गोव्यावर स्वारी करायला सांगितलं. त्याने गोपकपट्टण जाळून भस्म केले. पण यानंतर जयकेशीने ते पूर्ववत उभे केले आणि करवीर (कोल्हापूर) वेळूग्राम (बेळगाव) हे प्रांत आपल्या राज्याला जोडले. बळंबर(हैद्राबाद)चे शिंदे, बैलहोंगलचे कदंब यांचा पराभव करून जयकेशी कोकण चक्रवर्ती बनला.




जयकेशीनंतर त्याचा मुलगा शिवचित्त परमदेव हा राजा झाला. शिवचित्त परमदेवाच्या कारकीर्दीत गोपकपट्टण इथे सप्तकोटेश्वराचे देऊळ बांधण्यात आलं. तसंच तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर याच काळातलं आहे. या राजाची पत्नी 'कमलादेवी' ही गोव्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. ती अतिशय धार्मिक आणि कर्तबगार होती. या कमलादेवीने स्त्रियांसाठी एक खास न्यायालय स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.



यानंतर कदंबांच्या वंशात विष्णुचित्त विजयादित्य, तिसरा जयकेशी, वज्रदेव, स्वयंदेव आणि षष्ट्यदेव तिसरा हे राजे होऊन गेले. यापैकी काहींनी हाळशी, तर काहींनी गोपकपट्टण/चंद्रपूर इथून कारभार चालवला. कदंब राजानी दिलेले अनेक ताम्रपट अजून अनेक ठिकाणी पहायला मिळतात. त्यांनी गोव्यातल्या देवळांना उत्पन्नासाठी जमिनी दिल्या. गद्याण आणि डाक्मा ही सोन्याची नाणी काढली. कदंबपूर्व काळात देवळांमधे पूजाअर्चा स्थानिक लोक करत असत. कदंब राजांनी पंच द्रविड ब्राह्मणाना गोव्यात आणून वसवले आणि त्याना देवळांमध्ये पूजा करायला अधिकार दिले. हे 'जोशी' नावाचे ब्राह्मण होते आणि आर्यादुर्गा ही त्यांची कुलदेवता. अशा ब्राह्मणांसाठी कदंब राजांनी अनेक अग्रहार उभारले. गरीबांसाठी अनाथाश्रम उभारले. गोपकपट्टण इथे विद्यादानाचे केंद्र उभारले.




कदंबांचं राज्य उत्तर तसेच दक्षिण कोकणात पसरलेलं होतं. गोपकपट्टण हे महत्त्वाचं बंदर होतं. तिथून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. सुपे, हल्याळ, बेळगावकडून चोर्लाघाट आणि रामघाटातून गोव्यात माल यायचा, आणि गोवळकोंड्याहून हिरे निर्यात करण्यासाठी यायचे, ते याच मार्गाने. तसंच परदेशातून अरबी घोडे यायचे, ते याच मार्गाने घाटावर नेले जायचे. या रस्त्यातलं मुख्य जकात केंद्र मणिग्राम म्हणजेच आमोणा हे होतं. योग्य जकात गोळा करून सरकारी खजिन्यात जमा करणारे त्या काळातले तज्ञ दलाल घराणे कदंब राजांनीच कर्नाटकातून गोव्यात केंपे इथे आणून वसवले.

तिसर्‍या षष्ट्यदेवाच्या कारकीर्दीत देवगिरीच्या कण्णर यादवाने गोव्यावर हल्ले सुरू केले. तसेच होन्नावरच्या नवाबाने आरमारी हल्ले सुरू केले. या आरमाराच नेतृत्व इब्न बतूताने केलं असा उल्लेख आहे. षष्ट्यदेवाचा मेहुणा कामदेव याने एकदा यादवांचा पराभव करून गोव्याचे राज्य षष्ट्यदेवाच्या हवाली केले. पण त्याला ते सांभाळता आलं नाही. होन्नावरच्या सैन्याने हिंदूंची अंदाधुंद कत्तल केली आणि हे यादवांच्या आदेशावरून केलं अशी मल्लीनाथी केली. उत्तर गोव्याचा भाग यादवांच्या ताब्यात गेला. पण त्यांचं राज्य नंतर लवकरच लयाला गेलं. इ.स. १३०७-०८ मधे अल्लाउद्दिन खिलजीने आपला दख्खनचा सुभेदार मलिक काफूर याला प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत पाठवले. त्याने इ.स. १३१० साली हरपालदेव या रामदेवराय यादवाच्या जावयाचा पराभव करून देवगिरीचे राज्य धुळीला मिळवले. मग त्याची वक्रदृष्टी गोव्याच्या दिशेने वळली. त्याने इ.स. १३१५ मधे गोपकपट्टणचा सत्यानाश केला. सप्तकोटेश्वराचे देऊळ उद्ध्वस्त करून अमाप संपत्ती लुटली. सप्तकोटेश्वराचे लिंग लोकानी शेतात लपवले आणि नंतर दिवाडी बेटावर नेऊन तिथे एक लहान देऊळ बांधले. इ.स. १३२० मधे वेळ्ळी आणि रामाचे भूशिर इथले सेतुबंधेश्वराचे देऊळ धुळीला मिळवले. हिंदूंच्या कत्तली केल्या. अनन्वित अत्याचार केले. यातून जीव वाचवून षष्ट्यदेवाचा वारसदार वीरवर्मा याने राजधानी परत चंद्रपूर इथे हलवली आणि इ.स. १३२४ ते इ.स. १३४६ कसाबसा राज्यकारभार चालवला.


दरम्यान, महमद तुघलकाने इ.स. १३४४ साली चंद्रपूरवर हला चढवून अमाप धन लुटून नेले. पुन्हा इ.स. १३४६ मधे जमालुद्दिनने चंद्रपूरवर हल्ला केला. चंद्रेश्वराच्या देवळाची वीट न वीट मोडून टाकली. तिथल्या मोठ्या नंदीचे शिर उडवले. अजून हा भग्न नंदी देवळाच्या अवशेषांसकट पहायला मिळतो. त्याच्या सैनिकांनी स्त्रियांवर अत्याचार केले. मग तुघलकाने जबरदस्तीने या स्त्रियांची लग्ने आपल्या सैनिकांबरोबर लावून दिली. त्यांची संतती म्हणजे "नायटे". राजा वीरवर्माला हाल होऊन मरण आले. त्याच्या वंशातील स्त्रियानी आपले अलंकार कुशावती नदीत टाकून दिले. सोने नाणे उधळून दिले आणि "अत्याचार करणार्‍यांचा सत्यानाश होवो," असा आक्रोश करत कुशावती नदीत ठाव घेतला. त्यानी चंद्रेश्वराच्या द्वारात आक्रोश करताना पाय आपटले त्याच्या खुणा पायर्‍यांवर उमटल्या अशी लोककथा आहे. इथे कदंबांचे वैभवशाली राज्य लयाला गेले, त्याचबरोबर चंद्रपूर राजधानीचाही अंत झाला. आज हे एक लहान गाव आहे. गावात हिंदू वस्ती जवळ जवळ नाही. आम्ही नंदीच्या शोधात गेलो तेव्हा बरोबर रस्ता सांगणारा भेटला त्यापूर्वी दहा जणाना विचारावं लागलं!

१३४६ मधे गोव्यात हसन गंगू बहामनीची सत्ता सुरू झाली. पण यापूर्वीच १३३६ मधे विजयनगरच्या साम्राज्याची सुरुवात हरिहर आणि बुक्करायाने विद्यारण्यांच्या आशीर्वादाने केली होती आणि सगळ्या दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार सुरू केला होता. त्यांचा मंत्री, माधव याने इ.स. १३७८ मधे गोव्यात आपली सत्ता स्थिर केली आणि गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला. आतापर्यंत सप्तकोटेश्वराचे देऊळ ही गोव्यातल्या राज्यकर्त्यांची खूण बनली होती. या माधव मंत्र्याने हसन गंगू बहामनीने पाडलेले दिवाडी बेटावरचे सप्तकोटेश्वराचे देऊळ परत उभे केले. माधव मंत्र्यानंतर गोव्यात विजयनगरच्या साम्राज्याच्या सौंदे या शैव लिंगायत सुभेदारानी राज्यकारभार केला. त्यांचे वंशज इ.स. १७४५ पर्यंत कधी पोर्तुगीजांचे आश्रित तर कधी मराठ्यांचे आश्रित म्हणून गोव्यात टिकून होते.

इ.स. १४७१च्या फेब्रुवारीमधे महमूद गवनने तिसवाडी बेट जिंकले, आणि त्याचा सुभेदार किश्वरखान गोव्याचा कारभार पाहू लागला. इ.स. १४७२ मधे बेळगावच्या राजाने गोवा जिंकून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर गोव्याचा सुभेदार गिलानी याने बंड केलं आणि इ.स. १५०१ मधे गोवा बेट आदिलशहाच्या ताब्यात आलं. गोवापुरीतल्या एका मंदिराचा विनाश करून आदिलशहाने आपला राजवाडा बांधला. त्याचं प्रवेशद्वार अजून आपल्याला जुने गोवे इथे पहायला मिळतं. आदिलशहाच्या काळात फोंडा इथे आदिलशाही मशीद बांधली असं म्हणतात. ही मशीद एखाद्या देवळासारखी दिसते. तशीच काळवत्री दगडांची. समोर दीपमाळेचे असावेत असे वाटणारे पडके खांब आहेत. बाजूला एक सुंदर दगडी बांधणीचा तलाव आहे आणि एक विशाल वटवृक्ष आहे. मशिदीच्या भिंतीत आणि तलावात महिरपी आहेत. प्रथम बघताना ते एखादं देऊळ असावं असंच मला वाटलं होतं. पण तसा, म्हणजे देवळाच्या जागी मशीद केल्याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मी मनातली शंका मनात ठेवली!


इ.स. १४९८ मध्ये गोव्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना कालिकतला घडली होती, वास्को द गामाने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. आणि संपूर्ण भारत जिंकून घेण्याची स्वप्नं बघायला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुकर्क याने सुरुवात केली होती ती इ.स. १५०३ पासून.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित



गुरुवार, १४ एप्रिल, २०११

आमचे गोंय - भाग १ - प्राचीन इतिहास


कोकणीत गोवा म्हणजे गोंय.

ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते.

पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटकमार्गे गोव्याच्या, जंगलानी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत 'गोयंबा' म्हणजे भाताच्या लोंब्या. तर गुव्वा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यानी 'गोंय' किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या!

या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे प्रस्तरचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.

यापैकी उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आम्ही पाहिली आणि डोळ्याचे पारणे फिटले. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात.




मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण-कोळंब जवळचे उसगाळीमळ-पणसईमळ. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची झुआरी नदी. तिची एक उपनदी कुशावती. ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळंबजवळ तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट. ६ महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकार. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजानी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत, आज आपण काहीच सांगू शकत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस्स! रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरिणं वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्युह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना 'गुराख्यांची चित्रं' म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसर्‍या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो अर्धा बुजलाय. तिथे सरकारचा एक रखवालदार असतो असं ऐकलं पण आम्हाला काही तो भेटला नाही. या सगळ्या खडकावरची माती अद्यापही काढलेली नाही. आता साधारण १२५ आकृत्या दिसतात. माती नीट काढली तर कदाचित आणखीही काही सापडतील.









हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.

या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्‍या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!


अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्‍या जागी गरजेपुरतीच शेती करायची. अशा प्रकारची शेती गोव्यातले आदिवासी आता आता पर्यंत करत होते. या शेतीला कुमेरी असं नाव आहे. वारुळं, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष अशी त्यांची दैवतं होती. या वारुळांना सांतेरी असं नाव आहे. गोव्यात सगळीकडे आढळणारी सातेरी देवी म्हणजे आता 'शांतादुर्गा'. पण सांतेरी हे नाव अजूनही प्रचारात आहे. तर वेताळ, पाईकदेव, रवळनाथ हे सगळे राखणदार देव. तर लिंगदेवांना नंतर शंकर हे नाव मिळालं. या नैसर्गिक देवतांना त्यांच्या भोळ्या भक्तांनी कोणत्याही उपचारांशिवाय केलेली पूजा मानवत होती. त्यांची देवळंही कुठे नव्हती. तर वारुळं, जमिनीतून वर आलेला एखादा दगड यातच त्यांना त्यांचे देव दिसत होते. सुरुवातीचे कोळ-मुंड म्हणजे नंतरच्या काळातले कुळ-मुंडकार आणि कोळी, गावडे-गावकार हे गोव्याचे आद्य रहिवासी.

काजूर इथे असंच एक पाइकदेवाचं देऊळ दिसलं. देऊळ म्हणजे साधीशी झोपडी. तेही नंतर कधीतरी बांधलेलं आहे. पण त्याच्या समोर चपट्या दगडांची एक वर्तुळाकार पुरातन रचना आहे. त्या रचनेच्या मधोमध एक गुळगुळीत गोल दगड आहे. हे नेमकं कशासाठी, आम्हाला कोणी सांगू शकलं नाही. बहुधा ही आदिम लोकांची स्मशानभूमी असावी. त्या दगडांच्या वर्तुळाच्या मधे उभं राहिलं तर कोणी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर भयंकर परिणाम होतात अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे.



अंदाजे इ.स. पूर्व ६००० वर्षे या काळात समुद्राची पातळी आणखी कमी झाली, आणि किनारपट्टीला आणखी भूमी उपलब्ध झाली. गोव्यातले द्रविड, कोळ मुंड आपल्या पद्धतीने जगत असताना नंतर म्हणजे साधारण इ.स. पूर्व ५००० वर्षे, लढायांमधे हरून सुमेरियन लोक समुद्रमार्गे गोव्यात आले. त्यानी येताना आपल्याबरोबर देवळांची संस्कृती आणली. आणि ते इथल्या मूळ समाजात मिसळून गेले. यांचे वंशज म्हणजे आताचे पद्दे आणि चित्पावन ब्राह्मण असा काही इतिहास संशोधकांचा समज आहे. आणखी काही काळातच, किंवा याच्या आगेमागे, उत्तरेकडून आर्य लोक सार्‍या भारतवर्षात पसरले. त्यांनी आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे रुजवली. त्या व्यवस्थेत मूळचे आदिवासी असलेले गावडे आणि महार लोक शूद्र झाले असावेत. परशुरामाने इथे येणार्‍या आर्यांचे नेतृत्व केले असावे म्हणून ही भूमी परशुरामाने निर्माण केली अशा प्रकारच्या कथांचा उगम झाला. आताचं 'रिवण' म्हणजे पूर्वीचं 'ऋषिवन'. आताचं काणकोण म्हणजे पूर्वीचं 'कण्वपूर' कारण तिथे कण्व ऋषींचा आश्रम होता. अशा नावांवरून गोव्यातल्या आर्यांच्या वास्तव्याची माहिती मिळते.

हळूहळू गावगाडा चालवणारी व्यवस्था अस्तित्वात आली. आताच्या पंचमंडळांसारखी काहीतरी ही व्यवस्था असावी. म्हणूनच गोव्यात अनेक ठिकाणी 'बाराजण' नावाची ठिकाणे आहेत. कर्नाटक सीमेवरच्या जंगलातल्या लहान गावांमधे असे पंच म्हणजेच 'बुधवंत' लोक गावातल्या गोष्टींबद्दल निर्णय करतात. हे एकूण शांतताप्रेमी लोक होते. इ. स. पूर्व सुमारे ५०० वर्षांच्या काळात गोव्यात जैन आणि बौद्ध धर्माचे प्रचारक येऊन पोचले. त्यांचेही गोव्यात स्वागत झाले. त्यांच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा तयार केलेल्या आहेत. साखळीजवळ हरवळे, फोंड्याजवळ खांडेपार इथे आम्ही अशा गुहा पाहिल्या. यापैकी हरवळे येथील गुहा या पूजास्थान वाटतात, कारण त्यांच्या आतमधे लिंगं आहेत. तर खांडेपार येथे केवळ रहाण्यासाठी गुहा तयार केल्या असाव्यात कारण त्यांत प्रत्येक गुहेच्या आत २ खोल्या केलेल्या आहेत.



आतापर्यंत गोव्यात एकछत्री असं कोणाचं राज्य नव्हतं. जशी उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात साम्राज्यं उदयाला आली, तसा त्यांचा गोव्यात हळूहळू शिरकाव झाला. गोव्याच्या इतिहासातला अशा साम्राज्याचा पहिला उल्लेख आहे, मौर्य साम्राज्याचा.

इ. स. पूर्व ३२२ मध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य मगधाच्या नंदांचा पराभव करून राज्यावर आला. पुढील २४ वर्षांच्या काळात त्याने आपल्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप दिले. त्याचा पुत्र बिंदुसार याने हे साम्राज्य दक्षिण भारतातली द्रविड राज्यं वगळता पूर्ण भारतभर वाढवले. त्याच्यानंतर त्याचा महापराक्रमी पुत्र चक्रवर्ती अशोक सम्राट झाला. त्याने इ.स. पूर्व २३२ पर्यंत म्हणजे ४० वर्षे भारतावर राज्य केले. अशोकाने अनेक ठिकाणी शिलालेख लिहून ठेवले आहेत. या सम्राटांपैकी सम्राट चंद्रगुप्ताने उत्तर आयुष्यात जैन विचारसरणीचा अवलंब केला, तर अशोकाने कलिंगाच्या लढाईनंतर बौद्ध मताचा स्वीकार केला. या सर्व काळात गोव्यात मौर्यांचे राज्य होते. या काळात जैन तसेच बौद्ध धर्माचे प्रचारक सर्व भारतभर संचार करत होते. गोव्यात हरवळे सारख्या ठिकाणी जैन बैठक आढळते, तर बौद्ध भिख्खूंच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा आढळून येतात. यापैकी काही म्हणजे हरवळे, रिवण, खांडेपार इ. बर्‍याच ठिकाणी उत्खनन करताना इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक या काळातल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत.

इ. स. पूर्व २३२ मध्ये अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर, त्याचे साम्राज्य फक्त ५० वर्षे टिकले. आणि यानंतर पाटलिपुत्रावर सुंग घराण्याची सत्ता आली. या काळात मौर्यांच्या साम्राज्याची शकले झाली, आणि लहान राज्ये उदयाला आली. यानंतर सुमारे साडेचारशे वर्षे पैठण अर्थात 'प्रतिष्ठान' येथील सातवाहन कुलाची महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सत्ता राहिली. या कुळात शककर्ता सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात "शालिवाहन" होऊन गेला. याच्या काळात गोवा हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध झाले, आणि इथून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजांसाठी अरबी घोडे समुद्रमार्गे आणायला सुरुवात झाली.

तिसवाडी, बारदेश आणि साष्टी या तालुक्यात ४५० वर्षे, तर इतर तालुक्यात सुमारे २०० वर्षे पोर्तुगीजांचे राज्य वगळता गोव्याचा इतिहास बराचसा महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर निगडित राहिलेला आहे. सातवाहन साम्राज्याच्या लयानंतर सुमारे २०० वर्षे गोव्यात अस्थिर परिस्थिती राहिली होती. या काळात दक्षिण भारतातील चुतु, महाराष्ट्री, हाळसीचे कदंब, कोल्हापूरचे कुरा इत्यादि घराण्यातील राजांच्या सत्ता एकामागून एक गोव्यावर येऊन गेल्या. यापैकी हाळसी-पळसिग्गे (पलाशिका) हे खानापूरजवळचे एक प्राचीन गाव. इथले कदंब घराणे गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण याच घराण्याच्या एका शाखेने परत गोव्यावर सत्ता स्थापन केली ती इ. सनाच्या ११व्या शतकात. त्यावेळेला हे घराणे गोव्यात राहूनच गोव्यावर राज्य करत होते. आणि ती चारशे वर्षे गोव्याचा सुवर्णकाळ मानला जातो.

इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. हे भोज राजे अतिशय उदार होते. त्यांनी अनेक मोठी देवळे बांधली, आणि या देवळांच्या उत्पनासाठी अनेक गावे इनाम म्हणून लावून दिली. त्यानी दिलेले ताम्रपट आणि शिलालेख गोव्यात अनेक ठिकाणी सापडले आहेत. या काळात चंद्रपूर सार्‍या जगभर प्रसिद्ध झाले. सुमारे २०० वर्षे या राजघराण्याने गोव्याची खूप भरभराट केली आणि आपल्या राज्याचा विस्तार कारवार बेळगाव या भागातही केला. यांच्या एका चेदी या उपकुलातील काही लोकांना पुढे पोर्तुगीजांनी बळाने ख्रिश्चन केले, पण ते स्वत:ला चाड्डे म्हणवीत राहिले. आणि आपापल्या कुलदैवताना वर्षासने द्यायचेही त्यानी सुरूच ठेवले. "गोव्यातल्या प्रत्येक ख्रिश्चन माणसाला आपले हिंदू असतानाचे आडनाव माहिती आहे" असे आम्हाला रिवण येथे भेटलेल्या एका ख्रिश्चन व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे हा टुरिझम मध्ये असलेला माणूस आम्हाला रिवणच्या जीवोत्तम पर्तगाळी मठात भेटला होता, आणि आसपासच्या अनेक, हिंदूंच्या दृष्टीने पवित्र, ठिकाणांची माहिती त्याने दिली होती. एवढंच नव्हे तर त्याने "पर्तगाळी मठातल्या झर्‍याच्या पाण्याने सगळे रोग बरे होतात कारण ते डोंगरावरच्या गणपतीच्या पायापासून आलं आहे" अशी माहितीही दिली! त्याशिवाय "वेताळाच्या देवळात दिवेलागणीच्या वेळी जाऊ नका, घाबराल." असा प्रेमळ सल्लाही दिला!



इ. स. ५२५ मध्ये घारापुरीच्या कोकण मौर्यांनी भोजांचा पराभव केला. आणखी ५० वर्षांत बदामीच्या चालुक्यानी कोकण मौर्यांकडून गोवा जिंकून घेतला. त्यांचे राज्य सुमारे २०० वर्षे टिकले. याच काळात पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, कीर्तिवर्मा इ. महान राजे होऊन गेले. आणि इ.स. ७६८ मध्ये दक्षिण कोकणातल्या शिलाहारांच्या वंशातल्या शानफुल्ल नावाच्या राजाच्या मदतीने राष्ट्रकूट घराण्याच्या कृष्ण राजाने गोवा जिंकला. या शिलाहारांचे जे वंशज बाटवाबाटवीच्या काळात सक्तीने ख्रिश्चन झाले, त्यानी नाव घेतले 'सिल्व्हा'! या शिलाहारांची सत्ता गोव्यात सुमारे अडिचशे वर्षे चालली. ते राष्ट्रकूटांचे मांडलिक राहिले. याच कालावधीत खांडेपार येथे सप्तकोटेश्वराचे पूर्ण दगडी बांधणीचे पहिले देऊळ बांधण्यात आले. अगदी साधे आणि लहानसे असे हे देऊळ वैशिष्ट्यपूर्ण दिसते ते त्याच्या कळसावरील जांभ्या दगडात कोरलेल्या बैल, हत्ती या प्राण्यांमुळे. या देवळातही चौकोनी पिंडिका आढळते.


राष्ट्रकूटांच्या, कल्याणी चालुक्यानी केलेल्या पराभवांनंतर, शिलाहारांचे राज्य दुबळे झाले आणि कदंबानी गोवा जिंकून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. लवकरच कल्याणी चालुक्यांनी म्हणजे दुसरा जयसिंह याने रट्टराज शिलाहाराचा पराभव करून गोव्यासकट पूर्ण सप्तकोकणावर आपली सत्ता प्रस्थापित केली, आणि इ. स. १०४२ पासून कंटकाचार्य अर्थात शष्ठदेव कदंबाने चालुक्यांचा मांडलिक म्हणून गोव्याचा कारभार पहायला सुरुवात केली. हा खर्‍या अर्थाने गोव्याच्या वैभवाचा काळ होता. हे तेच कदंब राजे, ज्यानी "श्रीसप्तकोटीश्वरलब्ध वीरवर" हे बिरूद अभिमानाने मिरविले आणि आपल्या नाण्यांवरही "श्री सप्तकोटीश्वरलब्ध वरप्रसाद" असे लिहून श्री सप्तकोटीश्वराबरोबर आपले नाव अजरामर केले.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित


बुधवार, १३ एप्रिल, २०११

आमचे गोंय - प्रास्ताविक (२)





***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१)
आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

***

गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.

सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय.

काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली.

ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. मी ६ डिसेंबर १९९२ पासून गोव्यात राहते आहे. माझी मुलं तर आता गोंयकारच झाली आहेत. प्रीतमोहर गोव्यातलीच "अस्सल गोंयकार". अशा आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या तर्‍हांनी गोव्याशी संबंधित. आम्ही या संपूर्ण लेखमालिकेतले लेख लिहिणार आहोत.

आमच्यात कोणीच तसा इतिहासाचा शास्त्रशुद्ध, पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, पण शक्य तेवढी अधिकृत माहिती जमा करून आणि शक्य तेवढ्या ठिकाणाना भेटी देऊन, लोकांशी बोलून, काही ऐकिवातल्या गोष्टींची मदत घेऊन लेखमाला आपल्यापुढे आणत आहोत. कोणाला आणखी काही माहिती असेल तर ती या निमित्ताने सगळ्यांपुढे आणावी ही विनंती. तसंच, लेखमालिकेत जर काही चुका झाल्या, काही उणीव राहिली तर जरूर दाखवून द्या. कारण गोव्याचा इतिहास अभ्यासायचा तर मोठी अडचण म्हणजे, पोर्तुगीजांच्या पूर्वीचा फारसा इतिहास स्थानिक लोकांच्या स्मरणात नाही. देवळांशी संबंधित कथा लोकमानसात आहेत खर्‍या, पण त्या ऐकिव अशाच आहेत, आणि त्यावरून अचूक काळनिश्चिती करणं खूपच कठीण आहे.

दुसरा एक अनुभव मी प्रीतमोहरच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिला होता, की छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचा गोव्याशी खूप जवळून संबंध आला होता पण लोक त्याबद्दल फारसं बोलत नाहीत, किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. पोर्तुगीजानी त्याना सोयिस्कर तेवढाच इतिहास लोकांच्या कानी पडेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे, "शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या मोहिमांमुळे अर्ध्याहून जास्त गोव्यातले लोक धर्मांतरे होण्यापासून बचावले होते." किंवा "मुघलांनी आणि आदिलशहाने शिवाजी आणि संभाजीच्या विरोधात ऐन वेळेला पोर्तुगीजाना मदत केली नसती तर गोवा आणखी साधारण ३०० वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता" यासारख्या गोष्टी शोधूनच कुठेतरी वाचायला मिळतात. पोर्तुगीजानी जुने किल्ले पूर्ण उध्वस्त करून टाकले आणि सगळीकडे फक्त आपलाच ठसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. किंबहुना, जुना वैभवशाली इतिहास लोकांनी विसरून जावा अशीच त्यांची इच्छा असावी. त्यामुळे गोव्यातले बहुतेक ख्रिश्चन लोक हे धर्मांतरित स्थानिकच असले, तरी पोर्तुगीज राजवटीचे गोडवे ते अजूनही गातात आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजी आणि संभाजी हे "भायले" लोक होते हे क्लेशकारक आहेच, पण सत्य आहे.

गोव्यात एकूणच सुशेगाद वृत्तीमुळे असेल किंवा सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार असेल. पण इतिहासाबद्दल खूप अनास्था आहे. माहितीच्या शोधात भटकताना अगदी अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर असलेल्या गोष्टींबद्दलही "माहिती नाही" हे उत्तर अनेकदा मिळालं. ऐतिहासिक स्थळांजवळ योग्य दिशादर्शक पाट्या नाहीत, माहिती विचारायला आसपास कोणी नाही असे अनुभव अनेकदा आले. पाषाणयुगीन गुहांना सरसकट "पांडवांच्या गुहा" म्हणलं जातं, असे कित्येक प्रकार अनुभवले!

या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन.

- पैसा(ज्योती कामत)

क्रमशः

**

;विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

--मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित

सोमवार, ११ एप्रिल, २०११

आमचे गोंय - प्रास्ताविक (१)








***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१)
आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

***

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'!

बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं.

बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच.

साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही.

पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये.

माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले.

माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायावर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा.

असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.)

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला.

गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे.

असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये.

काही दिवसांपूर्वी 'प्रीत-मोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'पैसा'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण पैसा आणि प्रीत-मोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. पैसातैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली.

या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला!

या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा!

- बिपिन कार्यकर्ते

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- मायबोली , मिसळपाव व मीमराठी वर टीम गोवा या नावाने पूर्वप्रकाशित

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

कोचिंग क्लासेस- ०१

माझ्या शेजारच्या मुलांनी मला रोजच्यासारख खूप पिडल ..पण ते अभ्यासाबद्दल ...सूर्यमालेबद्दल...मग त्या संवादाच कोकणी रुपांतर करुन , व कोकणीतील जास्तीत जास्त शब्द सगळ्यांना कळतील अश्या बेतात हा दुसरा धडा लिहितेय

चुभु देउ नका घेउ नका ;)




[ वर्गान फकत्त बोवाळ चलला. भुरगीं पेपराची विमानां, खडु घेवन एकामेकाक मारतना मग्न जाल्यांत. टीचर आयिल्लीय तांका कळना....]

टीचरः आरे आरे श....................... वोगी रावात ........................वोग्गी..........आरे वोग्गी रावात.....

भुरगीं कांयच आयकुपाच्या मनस्थितीन ना....तांचो खेळ चालुच ..

टीचर : शी: शी: शी: ही भुरगीं म्हज्या तकलेर मिर्‍यां वाटपाची तितलीं उरल्यां....[पट्टी मेजार धाडायता,]

पट्ट्येच्या आवाजान भुरगी थण जातात....

टीचर किदें चललां रे हें हांगा? आँ? नुस्त्या बाजार तरी बरो.....तुमच्या बोवाळान आनी मस्त्येन म्हाका दिसाच्या उजवाडान गिरे आनी तारे दिसुंक लागले....

नाना: शक्युच ना टीचर. तु फंट सांगता .. दिसाचे खंय गिरे आनी तारे दिसता?

स्नेहा: आरे ट्युबलाईट तो वाक्प्रचार आशिल्लो...ताजो शब्दागणिक अर्थ घेंव नजो.

नाना ..हां हां ..बरें कळ्ळें म्हाका. तुवें सांगपाची गरज ना....
पुण टीचर गिरे आनी तारे म्हळ्यार सदांच मळबान दिसतात तीं नखेत्रां न्हंय?


टीचरः हम्म... हांव तुमकां मळबातल्या ह्या "नखेत्रांविशी" म्हायती सांगता

रातिच्या वेळार मळबाकडेन पळयल्यार कितलीशींच नखेत्रां आमका दिसतात. कांय लिकलिकतात तर कांय लिकलिकनात. जी लिकलिकतांत तांका तारे म्हणटात आनी लिकलिकनात तांका गिरे.

तार्‍यांक आपणालो खासा उजवाड आसता.तर गिर्‍यांक तो नासता. सूर्य होवुय एक तारो आशिल्ल्यान ताका ताजो उजवाड आसा.

प्रीतीमागीर गिरे उजवाड खंच्यान हाडटात?

टीचर गिर्‍यांक उजवाड तार्‍यांकडल्यान मेळटा. गुरु , शुक्र हे गिरे सूर्याकडल्यान मेळिल्लो उजवाड परतुन मळबान परावर्तित करतात देकुन ते तेजवंत दिसतात.

अदिती:
सूर्य, ताचे गिरे आणि उपगिरे हांच्या पंगडाक 'सूर्यमाळ' अशें म्हणटात . न्हंय टीचर?

टीचरः सामकें खरें.
आमच्या सूर्यमाळेन णव गिरे आसात. सूर्य हो आमच्या सूर्यमाळेचो केंद्रबिंदु जावन आसा. दिसाचे सूर्याच्या पर्जळित उजवाडाकलागुन हेर तारे आमकां दिसनात , जाल्यार रातीच्या वेळार सूर्याचो उजवाड नाशिल्ल्यान ते दिसतात.
अदिती: सगळे गिरे सूर्याभोवतणी घुंवतात खंय टीचर?
टीचरः हय .. गिरे सुर्याभोवतणी घुंवतात .. आनी गिर्‍यांचे उपगिरे तांच्या भोवतणी..जशी अर्थ म्हळ्यार आमची धरतरी सुर्याभोवतणी घुंवता आनी चंद्र धरतरेभोवतणी :)
गिर्‍यांच्या उपगिर्‍यांक चंद्र अशेंय म्हणटात. हे गिरे गुरुत्वाकर्शणाक्लागुन एकदाय आपलो मार्ग चुकनासतना सुर्याभोवतणी भोवतात.

पुप्या: टीचर गुरुत्वाकर्षण म्हटल्यार कितें?


टीचर
: गुरुत्वाकर्षण म्हळ्यार एका वस्तुची दुसर्‍या वस्तुक आपणाकडे वोडुन घेवपाची/ आकर्षित शक्ती. तुमी मॅग्नेट आनी लोखंड पळयला? मॅग्नेट लोखणाच्या वस्तुक आकर्षित करता तश्शेंच ... तुमी वयर मळबान जर एक फातर उडयलो जाल्यार कितें जाता?

भुरगीं : तो खाला पडटा.

टीचरः हें कित्याक घडटा?हाका गुरुत्वाकर्षण शक्त कारणीभूत.

नाना: जाल्यार चंद्र धरतरेर कित्याक पडना?

टीचरः ह्म्म हें त्या दोनुंय वस्तुंच्या वजन आणि तांच्यामदले अंतर हाचेर अवलंबुन जाता, आता म्हाका सांग फातर आम्च्यापासुन चड पयस आसा काय चंद्र?

भुरगीं :चंद्र खूब्ब पयस आसा

टीचर: बरोबर. चंद्र धरतरेमदीं कितल्याश्याच हजार किलोमीटराचे अंतर आसा. म्हण अशें घडटा
सूर्य पृथ्वीपरस सुमार १०९ पटीन व्हड आसा. पृथ्वीवेल्यान ६० किलो वजनाचो मनीस सूर्यार गेलो जायत , जाल्यार थंय ताजे वजन सुमार १६०० किलो जातले .... आनी पृथ्वील्या चंद्रार ६० किलोच्या मनशाचें वजन २२ किलो भरतलें :)

भुरगीं:
टीचर आता बाकीच्या ग्रहमालेची म्हायती सांग न्हंय ....

टीचरः
तो तुमका स्वाध्याय ....तुमी तुमका जमता ती म्हायती, चित्रां एकठाय करुन फाल्यां हाडात ...आमी वर्गान आमची सूर्यमाळ तयार करुया आनी हें करतना आमी सुर्यमाळेच्या प्रत्येक गिर्‍याबद्दल शिकुया.

बरें तर ..
चला आता सगली. आपापल्या घरा ....


प्रतिसाद दियात आनी हांवे लेख कसो बरयला तें जरुर सांगात


- प्रीमो





कठिण शब्दां अर्थ :


तकलेर मिर्‍यां वाटप : किंमत न देणे

नुस्त्या बाजार = मासळी मार्केट

नुस्तें = मासे

गिरे = ग्रह

मळब = आकाश

नखेत्र= नक्शत्र

उजवाड= प्रकाश/ उजेड

फातर = दगड

प्रीमो कोकणी क्लासेस-0

आजपासुन प्रीमो कोचिंग क्लासेस बोर्डावर सुरु करण्यात येत आहेत. आधी हा प्रकल्प माझ्या खवपुरता मयादित होता..पण काही मिपावरील आयडींच्या [डु आयडी असले तर मला ठाउक न्हाय] विनंती वरुन शिकवणी इथेही घेण्याचा विचार केला.
बाकी चुभुद्याघ्या
तर सुरवातीला काही हाय फाय नको ..

खालील घटना वाचा. तुम्हाला कळेलच अशी आशा आहे...नाहीच कळल तर समजाउन घ्या.
ढिश्क्लेमरः घटनांतील पात्र काल्पनिक नाहीएत ....फक्त घटनेतला ओरिजिनल प्रसंगाचा संदर्भ बदललाय. काही लोकांना ओरिजिनल संदर्भ कळतीलच .



टीचर : नमस्कार भुरग्यांनो म्हणा श्री गणेशाय नमः|
भुरगीं: श्री गणेशाय नमः|
टीचर: गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
हं चला आता गणेश्स्तवन करात.
भुरगीं:(एका सुरान) म्हणटात .
(म्हणुन जातकीच)
टीचर : कालचो गृहपाठ कोणे कोणे केलो ना?
असुर: हांवे केलो.
नाना: हांवेय केलो.
स्नेहा, पियु, डॉन, आनी हेर भुरगीं (धमु सोडुन): आमीय करुन हाडला गृहपाठ
टीचर : हांवे कोणे केलोना तें विचारलां ..तर भुरग्यानों गृहपाठ कोणे कोणे केलो ना?धमु?
धमु: हांवे गृहपाठ केला टीचर ....
टीचर: चल तर तुजें पुस्तक दाखय
धमु: टीचर हांवे बुक हाडुंक ना....
टीचरः तु बरो आयलो मरे... खरे सांग बुक हाडलो ना काय अभ्यासुच केलो ना?.
धमु: टीचर केलो ना अभ्यास :(
तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर

टीचर ..सॉरी बिरी म्हाका लागना ..आता तुका शिक्षा भोगची पडटली. भुरग्यानो हाका कसली शिक्षा दिवया तुमी सांगा ?

डॉन: टीचर हो एक नंबर फटकिरो ....सदांच फटिंग उलयता..ताका गृहपाठ धा(१०) पावट करपाक सांग ( स्वगत : आता खरी मजा येतली .तोणार आसुरी हांशें ..........)
नाना: टीचर ताका एक दिस माफ करुया ...तो परा लेगित अभ्यास करीना ..ताका कोण शिक्षा कर म्हणना ..मागीर धमुकुच कित्याक ती शिक्शा?
बाकीची भुरगीं बोवाळ घालतात .....

टीचर ..वोग्गी रावात सगळी. एकदम चुप ..कोणाचोच आवाज नाकां म्हाका.
धमु एक पावट सोडतां तुका, फुडले पावट जर तुझो गृहपाठ म्हाका दिसलो ना जाल्यार धा पावट बरवपाची तयारी करच पुण तुज्या आईबाबाक हांवे शाळेन आपयलां म्हण सांग .कळलें?

धमु : ओके टीचर._/\_

टीचर : चला. आज आमी चित्रां काडुयात :)

भुरगीं वेळ-काळ विसरुन , मजा करत चित्रां काडपा लागतात .

(समाप्त )

कठिण शब्दां अर्थः
भुरगीं - मुले
हांव = मी (प्रथमा एक वचन)...उदा. हांव प्रीतमोहर = मी प्रीतमोहर आहे.
हांवे= मी (तृतीया एकवचन) उदा हांवे अभ्यास केलो = मी अभ्यास केला
जातकीच = झाल्यावर
हेर (उच्चार : हॅर) = इतर
आयिल्लो = आला होता
फटकिरो = फटिंग = खोटारडा
हाशें = हास्य
लेगित = सुद्धा
बरवप = लिहिणे

आजचो गृहपाठ आनी म्हज्या क्लासाची फी : सद्दां किमान ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं

आयज जागतिक मराठी दिन .. त्यानिमतान कांय कोकणी कवितांचो अणकार

हा लेख मु़ळात मिसळ्पाव.कॉम वर माझ्या मैत्रिणीने लिहिलेल्या एका लेखाचा पुढचा भाग आहे

पैसा ताई च्या लेखात लिहिल्याप्रमाणे कोकणी- मराठी ह्या बहिणी आहेत हे तर कळलेच असेल . तर आता आपण काही कोकणी रचना पाहुया
कोकणी कविता- विश्वात , मराठी वाचकांच श्रद्धास्थान , अभिजात लेखक व कवी श्री. बा भ. बोरकर उर्फ आमचे बाकीबाब ह्यांना एक आदरणीय स्थान आहे . तेव्हा सुरवात बाकीबाबांच्या काही मधुर रचनांनी .


पायजणां

त्या दिसा वडाकडेन गडद तिन्साना
मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां

मौन पडले सगळ्या राना, शिरशिरुन थाम्ली पाना
कवळी जाग आय्ली तणा झेम्ता झेम्ताना
मंद मंद वाजत आय्लीं......

पय्सुल्यान वाजली घांट , दाट्लो न्हय्चो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा
मंद मंद वाजत आय्लीं.......

फुलल्यो वयर चंद्रज्योती रंध्रांनी लागल्यो वाती'
नवलाची जांवक सांगली शकुन लक्षणां
मंद मंद वाजत आय्लीं......

गळ्या सुखां दोळ्यां दुखां लकलकली जावन थिका
नकळ्ताना एक जाली आमी दोघांजाणा
मंद मंद वाजत आय्लीं.....

कान्सुलांनी भोवती भोवर , आंगार दाट फुलता चवर
पड्टी केन्ना सपना, तीच घडटी जागरणा
मंद मंद वाजत आय्लीं......

ही कविता बाकीबाबांच्या १९६० साली प्रकाशित झालेल्या पायजणां ह्या कोकणी कवितासंग्रहातील आहे. आणि ह्या संग्रहातील ही सर्वात सुंदर कविता आहे . मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां ह्या गाण्याची ओळ न ओळ मनात अगदी रुणझुणत येते असच वाटत. एवढ्या हळुवार ओळी केवळ बाकीबाबच लिहु शकतात!!!

अनुवादः
त्या दिवशी वडाच्या बाजूने काळोख्या तिनी सांजेला,
मंद मंद वाजत आली तुझी पैंजणे...

सगळे रान मूक झाले.पाने शहारून थांबली..
तृणपात्याना झोपेतून कोवळीशी जाग आली..

दूर कुठेशी मंजूळ घंटा वाजली.. नदीच्या काठाचा कंठ दाटून आला..
त्या क्षणी सावल्यांनाही घमघमाट आला...

अंतराळात चंद्रज्योती फुलल्या, रंध्रांतून ज्योती तेवल्या..
सगळे नवलाचे शुभशकुन होऊ लागले...

तोंडी सुखाचे बोल आले..डोळ्यात अश्रु लखलखले..
तिलाच नकळत आम्ही दोघे जण कशी एकरुप झालो...

कानशिलांत जणू भोवरा फिरे.. अंगी आले दाट शहारे...
कधी स्वप्न पडे.. तेच जागेपणी घडे...

थिका= मोती


पायजणां याच संग्रहातील अजून २ गीते

साद तुगेले

साद तुगेलॅ आयकुंक आय्ले करचे किदें कळना...
सगळ्या दिकांनी सोदलो तुका तु सोदुन लेगीत मेळ्ळॉ ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना

सोबीत पोर्सुआंची हीं कोण फुलां फुलयता
हो खेळ आपा-लिपाचो हांगा कोण कोणाक शिकयता
सगळे पळय्ले उग्त्या दोळ्यांनी सांगुक लेगीत शक्ले ना
दोळ्याकडेन येवन रावली दुकां गालार येकुय देवेलें ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना..

आमोरेच्या पारार दोन सवणी परतताली
तीं सदांच अशीं येतली, अशे सगळीं समजतालीं
ल्हान मनातलें व्हडले सपन एकामेकांक कळले ना
दोळ्याकडेन येवन रावली दुकां गालार येकुय देवलें ना.....
माका दर्या दिसलो ना,माका ल्हार मेळ्ळे ना
माका येवचे आस्लें तुजेच्कडे माका वाट समजली ना..

अनुवाद


साद तुझे ऐकु आले, काय करावे कळेना
सगळ्या दिशांत शोधल तुला तु शोधुन सुद्धा सापडेना
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही


सुंदर परस्बागांतली ही कोण फुले फुलवतो
हा खेळ लपा-छपीचा इथे कोण कोणास शिकवतो
सगळे पाहिले उघड्या डोळ्यांनी, सांगुही शकले नाही....
डोळ्याच्या कडात अश्रु आले पण गालावर एकही उतरला(ओघळला) नाही
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही

तिन्हीसांजेच्या वेळी दोन पक्षी परतत होते
ते रोजच असे येतील , असे सगळे समजत होते
लहान मनातले मोठे स्वप्न एकामेकांना कळले नाही
डोळ्यांच्या कडात अश्रु आले पण गालावर एकही उतरला(ओघळला) नाही
मला समुद्र दिसला नाही, मला लहर सापडली नाही
मला यायच होत तुझ्याचकडे मला वाट समजली नाही



माणकुल्याक पयली धर

फाल्या बरय परां वाच, फावल्या वेळान चितना कर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

तानेले डोळे ताजे, तुजी नदर सोदता
आशेले पाय ताजे तुजेकडेन मोडटा
मोगाळ काळीज मागता मोग , सगळी कामा कुशीक दवर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

धाकटुलेच हात ताजे साळकाभाशेन फुलता
दात ताजे मोगरे कळे अर्दे उसोवन थामता
हासो ताजो गिळचे आदीच पयल्या वेळेक जिकुन धर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर

आकुर कशी कवळी बोटां तुज्या केसांन घुसपुं दी
दसणी कळे वोंठ ताजे तुज्या पावलाक सासपु दी
कोत तुजें जीविताचें अमृतामुपात धर
माणकुल्याक पयली धर, माणकुल्याक पयली धर


अनुवादः
उद्या लिही परवा वाच फावल्या वेळेत चिंतन कर
तान्हुल्याला आधी उचल, तान्हुल्याला आधी उचल

तहानलेले डोळे त्याचे, तुझी नजर शोधतात..
आसावलेले पाय त्याचे तुझ्याकडेच वळतात..
प्रेमळ काळीज त्याचं मागतंय ग माया
सगळी कामं ठेव बाजूला, उचल आधी तान्हुल्याला...

इवलेसे हात त्याचे साळकासारखे फुलतात...
दात त्याचे जणु मोगर्‍याचे कळॅ अर्धे उमलुन राहतात.....
हास्य त्याच मावळण्याआधीच, पहिल्या वेळेला जिंकुन घे
तान्हुल्याला आधी उचल तान्हुल्याला आधी उचल

आकुरासारखी कोवळी बोटं तुझ्या केसात रुपू देत,
जास्वंद कळीचे ताजे ओठ तुझी पावलं चाचपू देत
मूल्य तुझ्या जीविताचे अमृतपान्ह्याने कर .
तान्हुल्याला आधी उचल....


(साळक== कमळाचा १ प्रकार)
(आकुर= कोवळ्या अंकुरांची एक भाजी)

आता स्व. मनोहरराय सरदेसाईंच्या खालील कविता पहा

कोलो आणी दाखां-झेलो
एकलो कोलो भूकेल्लो
दाखां- मळ्यांत गेलो
पिक्या- दाखां- झेलो देखून
खुशालभरीत जालो
मिटक्यो मारीत,
उडक्यो मारीत रावलो,
खर्शेलो,
तरीय वयलो दाखां झेलो
तसोच वयर उल्लो
कोलो ल्हवुच भायर सल्लो
(दुसरो कसलो नासलो उपाय)
आणी मनांत फुतफुतलो
"आंबट दाखो कोणाक जाय?"

काय म्हणता? कळली तुम्हाला कविता? ....हो....कोल्ह्याला द्राक्षे आंबट वाली गोष्ट यात सांगितलीय.
आहेत की नाही मराठी-कोकणी सख्या बहिणी?

कठीण शब्दांचा अर्थ:
झेलो = गुच्छ ( पण काही वेळेला हार या अर्थी ही वापरतात )
खुशालभरीत जालो= आनंदित झाला
खर्शेलो= धाप लागली
ल्हवुच= हळूच
भायर सल्लो = बाहेर पडला
फुतफुतलो= पुटपुटला
कोलो = कोल्हा
दाखां - द्राक्षे


बर आता कवी मनोहरराय सरदेसाई यांची अजून १ कविता

मेस्त आनी बरोवपी

कालुच म्हाका येतना घरा
दिसलो वाटेंत मेस्तुलो
सांवरे- रुखार बसलेलो
आपले तोचीन खुटू, खुटू
खांद्याक बुराक काडटालो .
हांवे म्हळें, " मेस्तामामा,
बेश्टो कित्याक कश्ट घेता
तुजे तोंचीन दिसता तुका
सावरे रुखाक कापतलो?
तोंच तुजी धाकटुली
सांवर आसा व्हड कितली
कितलो वावर करतलो?
वोगीच पुता खरशेतलो

मेस्तमामान तकली हालोवन
म्हाका म्हळें,सारके पळे
हांव गा रुखाक कापीन कसो?
शक्त म्हजी कितली ल्हान,
हांव गा असो रुखा खांद्यार
म्हजे तोंचीक काडटा धार".

आयलो आजच दनपारा
तोच मेस्त म्हज्या घरा
सदांभशेन हांव असोच
कितेंय तरी बरयतालों
जनेलार बसलो आनी
मेस्तुल्यान म्हळें म्हाका:
बेश्टो कित्याक कश्ट घेता
बरोव-बरोवन दिसता तुका
सगलीं पाना भरतलो?
सगल्या लोकांक गिन्यान सांगुन
व्हडले शाणे करतलो?
लिखणी तुजी कितली
वावर आसा चड व्हडलो
वोगीच पुता खरशेतलो!!!"

हांस-हांसत हांवे म्हळें:
मेस्तमामा सारके पळे
पिशेपणा- गिन्यान अशें
एकटो हांव वाटन कसो
शक्त म्हजी कितली ल्हान
लिखणी म्हजी धाकटुली
हांव असोच पाना- पानार
म्हज्या मनाक काडटा धार."


मेस्त = सुतार (इथे तो सुतारपक्षी म्हणुन वापरलाय)

अनुवाद

कालच घरी येतांना मला
दिसला वाटेत सुतार(पक्षी)
सावरीच्या झाडावर बसलेला
आपल्या चोचीने खुटू खुटू
फांदीला भोक पाडीत होता
मी म्हंटलं" सुतारमामा,
उगीच का कष्ट करतोस
तुला वाटतंय का तुझ्या चोचीने
सावरीच्या झाडाला कापशील?
किती काम करशील?
उगीच दमून जाशील

सुतारमामाने डोकी हलवून
मला म्हंटलं ," नीट बघ,
मी रे झाडाला कसा कापीन?
शक्ती माझी केईती लहान
मी असाच झाडाच्या फांदीला
माझ्या चोचीला धार काढतो

आला आजच दुपारी
तोच सुतारपक्षी माझ्या घरी
रोजच्यासारखाच मी असाच
काहीतरी लिहित होतो
खिडकीवर बसला आणि
सुताराने म्हंटले मला
उगीच का कष्ट घेतोस
तुला वाटतय का लिहून लिहून
तू सगळी पानं भरशील?
सगळ्या लोकांना ज्ञान देऊन
मोठे शहाणे करशील?
लेखणी तुझी केवढी!!
काम आहे फार मोठ्ठ
उगीच दमून जाशील !!!

हसत- हसत मी म्हटलं
वेडेपणा- ज्ञान हे असा
मी एकटा कसा वाटू शकेन?
शक्ती माझी किती लहान
लेखणी माझी छोटुकली
मी असाच पाना-पानावर
माझ्या मनाला काढतोय धार

पांढऱ्यावर काळं करण्याचा माझा एक प्रयत्न .कसा वाटला जरूर सांगा .

आपलीच
प्रीत-मोहर